नागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

लोकशाही वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब

नवी दिल्ली दि.२२ डिसेंबर

खासदारांच्या निलंबनाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. असे शरद पवार साहेब यांनी बोलताना म्हणाले आहेत.

पवार साहेब म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर देशाच्या संसदेसाठी आणि लोकशाहीसाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी एकत्रित लढण्यासाठी तयार आहे असे यावेळी शरद पवार साहेब म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सदस्यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांकडून आज शुक्रवारपासून देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी करण्यात येत आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, आज प्रत्येक गावात गेल्यावर या देशातील जनतेच्या उपासमारीचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. काम करणारे युवकांना मेहनतीचा मोबदला मिळत नसल्याने दुःखी आहे. देशातील आदिवासी असो वा दलित असो गावात राहून आपले प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे दु:खी आहेत. या समस्यांना कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे. आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि कठोर परिश्रम करून लोकशाहीवर आघात करणारी ही सामुदायिक शक्ती दूर करू यावर मात करण्यासाठी आपण एकजूट राहू या असा विश्वास शरद पवार साहेब यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button