बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नांदेड येथील अनधिकृत मुलींचे बेकायदा वस्तीग्रह बंद करणे बाबत

महिला व बालविकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढाजी यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली.

मुंबई

नांदेड जिल्ह्यातील बाबा नगर येथे संस्कार नावाने मुलींचे वसतिगृह गेल्या एक वर्षापासून सुरू आहे . सदर वस्तीगृहात साधारणतः १०० मुली राहत असून त्यातील बहुतांश मुली अल्पवयीन आहे आहेत. या वसतीगृहात मुलींच्या सुरक्षिततेकरिता कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. येथे महिला वॉर्डन व सुरक्षा रक्षक नाहीत, त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले.

या वसतीगृहाला नांदेड महानगरपालिकेची अथवा महिला बालविकास विभागाची कोणतीही परवानगी नाही, असे असतानाही गेल्या एक वर्षापासून सदरील वसतिगृह महानगरपालिका आणि महिला बालविकास विभाग जि.प. नांदेड यांच्या येथील अधिकाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने बेधडकपणे सुरू आहे.

या वस्तीगृहात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे ?

तरी सदरील वसतीगृहाविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी याकरिता महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर केले आहे. आणि जर या बेकायदा अनधिकृत वस्तीगृहाविरुद्ध तात्काळ कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button