महाराष्ट्रमुंबई

बोरीवली गोराईतील पाणीटंचाईची समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य – पियुष गोयल

बोरिवलीतील गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.

मुंबई: बोरिवलीतील गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीनुसार झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून तेथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन भाजप आणि महायुतीचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांनी दिले. पियुष गोयल यांनी आज आमदार सुनील राणेंच्या पाठीमागे स्कूटरवर स्वार होऊन जनआशीर्वाद रथातून नागरिकांशी संवाद साधत रस्त्यावर लोकांपर्यंत पोहोचून बोरिवलीवासीयांची मने जिंकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध योजनांमुळे जीवनमानात कसा बदल झाला आणि सर्वसामान्यांना किती दिलासा मिळाला, हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले. गेल्या काही वर्षात बोरिवलीचा कसा बदल झाला आहे हे सांगताना पियुष गोयल यांनी येत्या काही दिवसांत कायापालट होणार असल्याने पंतप्रधान मोदींना मतांच्या रूपाने आशीर्वाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
सिंधुदुर्ग भवन, सेक्टर 6, आरपीडी 7, बोरिवली (पश्चिम) ते पेप्सी ग्राउंड, गोराई या मार्गावर या मेगा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जन आशीर्वाद प्रचार रथ या अभियानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रचारफेरी मार्गावरील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रथाचे पुष्पहार घालून स्वागत केले व पाठिंबा व्यक्त केला.
प्रचार रथ काही निवासी भागातून जाऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन पियुष गोयल यांनी बोरिवली मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांच्या पाठीमागे स्कूटरवर बसून निवासी भागात फिरून नागरिकांच्या भेटी घेतल्या.
या अभियानात बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी महायुती घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button