महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक संपन्न

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरांना विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, तुमचे आंबेडकरी विचारांशी रक्ताचे नाते आहे आणि आमचे विचारांचे नाते आहे. त्यामुळे रक्त आणि विचार एकत्र आले की आपण कोणालाही थोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तर मी माझी भूमिका मांडली आहे. त्यांना कळत की कळत नाही. हे मी नाही सांगणार. कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. ते वकील आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण शत्रूच्या विचाराशी लढताना एक पाऊल मागे घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरांनी न रागवता याबाबतचा विचार कराव, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती केली आहे. तसेच, जागावाटपाबाबत जे काही तिढे आहेत, ते सर्व तिढे सुटले जातील, असे आव्हाडांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे हे अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या अवमानाबद्दल माहीत नाही. कोर्टाच्या ऑर्डर मधे स्पष्ठ पणे लिहण्यात आलं आहे की घड्याळ हे चिन्ह आत्ता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करताना त्याच्या खाली ही गोष्ट न्याय प्रविष्ठ आहे असा लिहण बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील जनता मूर्ख आहे का? असा तटकरे यांना वाटतं आहे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी खा.निवास पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी, अभिजीत पाटील, श्रीमती विद्याताई लोळगे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button