महाराष्ट्रमुंबई

*”स्वच्छ भारत अभियान” च्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता श्रमदान कार्यक्रम

*"स्वच्छ भारत अभियान" च्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता श्रमदान कार्यक्रम

मुंबई

स्वच्छ भारतासाठी महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनावरून सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या स्वच्छता अभियान “स्वच्छ भारत अभियान” च्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता  करण्यात आली.
राष्ट्रपिता “महात्मा गांधीजी” यांची जयंती निमित्त श्रमदान कार्यक्रमादरम्यान भाजपा मुंबई उपाध्यक्ष तथा आमदार राजहंस सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी येथील श्री कृष्णा नगर – संतोष नगर मुख्य रस्त्यावर स्वच्छता करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांसह परिसरातील देवमाणूस आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देशाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजन सिंग, जे.पी.सिंग, कमलेश शुक्ला, आनंद सिंग, अयोध्या पाठक, संजय आव्हाड, जितेंद्र गुप्ता, दिवेश यादव, एड. सुनीलकुमार शर्मा, नारायण पाटील, संकेत नलावडे, सुधीर राऊत, रामकुमार सोनी, ग्रेजेश सिंग, अमृता थोरात, भारती बेंडे, रिता सिंग यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने “स्वच्छता हीच सेवा” अभियानात सामिल होण्याचे आवाहन समस्त देशवासीयांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज असंख्य स्वच्छ्ता दुतांसोबत “एक तारीख, एक तास एकत्र” मोहिमेत सहभाग घेतला व स्वच्छता अभियानात  *डॉ नितेश राजहंस सिंह जी*  उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री आपले योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button