बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक…

हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, याविषयावर सरकारला विचारले प्रश्न...

मुंबई

दि. २१ मार्च –

झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button