बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

चांदिवलीत हाथ से हाथ जोडो अभियानची सुरुवात

जागोजागी नसीम खान यांचे जंगी स्वागत

मुंबई

प्रतिनिधी –

कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नफरत छोडो – भारत जोडो यात्रेनंतर अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने देशात हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करण्यात आला आहे. मुंबई मध्ये यांची सुरुवात चांदिवली मतदार संघात प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरुवात झाली.

सुरु असलेल्या या अभियानात नसीम खान यांनी मतदार संघात घरोघरी लोकांच्या भेटी घेत राहुल गांधी यांना त्याच्या यात्रेत आलेले लोकांचे प्रश्न, समस्या, बेरोजगारी, महागाई आणि त्यावर मात करण्यासाठी सर्वानी हाथ से हाथ जोडो अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाला अंधाराच्या गर्तेतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुनः एकदा स्वर्णीय भारत घडवू असे लिहिलेल पत्र लोकाना वितरित केले या अभियानात नसीम खान यांचे जागोजागी जंगी स्वागत करीत उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजोरोंच्या संख्येने लोक सहभागी झाले.

चांदिवली विधानसभेतील हाथ से हाथ जोडो अभियानात मुंबई कॉँग्रेस उपाध्यक्ष शरीफ खान, तालुक्यातील प्रदेश प्रतिनिधी गणेश चव्हाण, मो गौस शेख, जिल्हा पदाधिकारी वजीर मुल्ला, शरद पवार, विद्यापती राय, जमाल खान,हैदरअली शेख, निलेश वाघमारे, अतुल माघाडे, शहजाद खान, मुर्तुजा अन्सारी, शहजादे शेख अवधूत शेलार, ब्लॉक अध्यक्ष सुलेमान कुलावूर, रामभाऊ गजकोश, नितीन पवार, मोबिन राईन, कमल जोशी, अस्लम खान, सईद खान, अॅथोनी चेटीयार, अशोक पोळ, महिला तालुकाध्यक्ष माया खोत, युवक तालुकाध्यक्ष अरुण कुमार, सेवादल तालुकाध्यक्ष गुलाबचंद शुकला मागासवर्गीय तालुकाध्यक्ष शंकर वाघ, स्लम सेलचे तालुकाध्यक्ष यूसुफ खान, व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष प्रदीप शाह यांच्या सह हजोरोंच्या संख्येने लोक सामील झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button