बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

शेतकरी-कष्टकरी यांचे दु:ख सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई

राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत शिंदे सरकारला फटकारले आहे.

दरम्यान या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का ? असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे.

 

शेतकरी आणि कष्टकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनाच्या दिशेने चालत निघाले आहेत. हे ‘लाल वादळ’ नेमकं कशासाठी आणि काय आहे हे किमान समजून घेण्याची संवेदनशीलता सरकारने दाखविली पाहिजे अशी मागणीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

 

दरम्यान स्वतः मुख्यमत्र्यांनी पुढाकार घेऊन या मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असे स्पष्ट मतही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button