जळगावबातम्यामुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

चोपडा तालुक्यात कांदा काढणीला सुरुवात भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

चोपडा तालुक्यात कांदा काढणीला सुरुवात भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

जळगाव –

चोपडा तालुक्यात रांगडा कांदा सह लाल कांद्याची ही लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत असतात लाल कांदा सध्या काढणीला आलेला आहे. शेतात लाल कांदा काढताना मजूर दिसत आहे.गेल्या महिन्यात आलेला अवकाळी पाऊस त्यामुळे कांद्यावर झालेला परिणाम आणि आता काढणीला आल्यावर कांद्याला भाव नसल्याने शेतकरी राजा मात्र चांगला संकटात सापडलेला आहे. लागलेला खर्च भरमसाठ असताना कांद्याला पाहिजे तसा भाव नाही लागलेला खर्च निघतो की नाही हा देखील प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे रांगडा कांदा भाव नसल्याने काडीमोड किमतीत विकावा लागला त्यानंतर लाल कांदा लागवड केली या मध्ये भाव मिळेल आणि डोक्यावर असलेलं कर्ज हे दिलं जाईल या आशेने शेतकरी छातीवर दगड ठेवून कांदा लागवड करीत असतो.

परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही परंतु केंद्र सरकारने राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. कारण त्याचा शेतीमालाला भाव मिळत नसल्याने कर्जाचे डोंगर डोक्यावर आहे. अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले या शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष दिल अशीच अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button