Uncategorized

प्रकल्प जात आहेत, याची नितीन गडकरींनी गंभीर दखल घ्यावी – खासदार अरविंद सावंत

प्रकल्प जात आहेत, याची नितीन गडकरींनी गंभीर दखल घ्यावी - खासदार अरविंद सावंत

राज्यातल्या सरकार नियमबाह्य आणि कायद्याचा गैरवापर होताना दिसून येत आहे. ईडी आणि पिढीचा गैरवापर होताना दिसून येत आहे. तसेच पोलिसांचा गैरवापर करायचा, असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी राज्यसरकार आणि पोलिसांवर केला आहे.

शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) पोलिसांवर मोर्चा काढला होता. त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस देण्यात आली. नोटिसला उत्तर देण्यासाठी खासदार अरविंद सावंत NRI पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे हजर राहिले होते.

अनेक पॅटर्न आहेत. मात्र लोकांच्या कंपन्या पळवणारा, आमच्या राज्यातलं अन्य राज्यात पळवून न्या, हा एक नवीन पॅटर्न आहे. सर्वकाही निवडणुकीसाठी होताना दिसून येत आहे. राज्याचे सरकार लाचार आहे. प्रकल्प जात आहेत, याची गडकरींनी गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button