बातम्यामहाराष्ट्र
Trending

नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदुरनाका जवळ खासगी बसला लागलेल्या आगीत १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ३४ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदुरनाका जवळ खासगी बसला लागलेल्या आगीत १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ३४ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिरची हॉटेलजवळ येथील चौफुलीवर पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे. ट्रेलर व बसमध्ये हा अपघात झाला. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना झाल्यानंतर अनेक प्रवाशी झोपेत होते. स्लिपर कोच असल्यामुळे अनेक प्रवाशांना उठण्यास वेळ लागला. काही प्रवाशी उतरले. यातील जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या गाडीत ३० ते ४० प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही गाडी चिंतामणी ट्रॅव्हल्सची असल्याचे सांगण्यात आले. पोलिस व
अग्निशमन दलाचे जवाना घटनास्थळी दाखल झाले आहे. या आगीत बस जळून खाक झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button