बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या भूमीवर स्थान नाही – तेजिंदर सिंग तिवाना

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महाठगबंधन आणि राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड जनआक्रोश आंदोलन !

मुंबई

आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईतील विरोधी आघाडीच्या बैठकीच्या स्थळ (ग्रॅन्ड हयात हॉटेलच्या बाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे स्वागत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.

मुंबईत आंदोलनादरम्यान भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्राचे वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाणूनबुजून अवमानकारक वक्तव्य करत आहेत. हिंदूंची हत्या करणाऱ्या ममता बॅनर्जीं सारख्या लोकांना येथे स्थान नाही. मुंबईत हिंदू विरोधकांसाठी रेड कार्पेट टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना लाज वाटते. उद्धव ठाकरे आधी सोनिया गांधींच्या मांडीवर खुर्चीत बसले आणि आता हिंदू बहिणींवर अत्याचार करणाऱ्या, हिंदू बहिणीची हत्या करणाऱ्या ममता बॅनर्जींना बहीण बनवत आहेत. युवा मोर्चाचे अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांना आंदोलनात घुंघरू भेट देताना म्हणाले की, उद्धवजी जर सत्तेसाठी नाचायचे असेल तर घुंघरू घाला आणि चांगले नाचवा म्हणजे जनतेला तुमचा खरा चेहरा आणि हेतू स्पष्ट दिसेल. काल पर्यंत एकमेकांविरुद्ध विचारसरणीच्या पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाआघाडी केली, पण त्यांना देश आणि जनतेशी काही देणेघेणे नाही, सर्वांचा डोळा फक्त खुर्चीवर आहे. जनआक्रोश आंदोलनात हजारो तरुणांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button