मुंबई

राज्य सरकारची मुंबईकरांना मोठी भेट, मुंबईतील पाचही टोलनाके टोलमुक्त

राज्य सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेत मुंबईतील पाचही टोलनाके टोलमुक्त केले आहेत. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्त करण्यात आले आहे

श्रीश उपाध्याय/मुंबई: राज्य सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेत मुंबईतील पाचही टोलनाके टोलमुक्त केले आहेत.
मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्त करण्यात आले आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोलनाक्यांवर हा आदेश लागू होईल.

राज्य सरकारची मुंबईकरांना मोठी भेट

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. विद्यमान सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक सोमवारी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील जनतेला दिलासा देत पाचही टोलनाके टोलमुक्त केले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button