महाराष्ट्रमुंबई

Mumbai: देश सुरक्षित राहिला पाहिजे, या सुरक्षेची हमी हिंदू मूल्ये – आचार्य पवन त्रिपाठी

नॉर्थ इंडियन ट्रेडर्स असोसिएशनच्या स्थापना दिनाची सांगता झाली

‘देश सुरक्षित राहिला पाहिजे, या सुरक्षेची हमी हिंदू मूल्ये आहेत.’ वरील प्रतिपादन मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी केले. उत्तर भारतीय व्यापारी संघ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवन त्रिपाठी बोलत होते.
स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघाचे मार्गदर्शक आमदार प्रसाद लाड व उत्तर भारतीय व्यापारी संघाचे अध्यक्ष ललित यादव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, प्रथम देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि या सुरक्षेची हमी हिंदू मूल्ये आहेत. जोपर्यंत या देशात सनातनचे वर्चस्व आहे तोपर्यंत आपण सर्व सुरक्षित राहू शकतो. आज बांगलादेशसह जिथे जिथे हिंदू संस्कृती कमकुवत झाली आहे तिकडे बघा. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच उत्तर भारतीयांचा आदर केला आणि त्यांच्या हिताची काळजी घेतली. महाराष्ट्रात भाजपचे युतीचे सरकार असल्याने उद्योगपतींना धमकावून कोणीही पैसे उकळू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेद्वारे कर्ज देऊन छोट्या व्यापाऱ्यांना सक्षम करण्याचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button