महाराष्ट्रमुंबई

Mumbai: पाणी टंचाई व दूषित पाण्याबाबत महापालिका एल विभाग कार्यालयावर भाजपचा धडक मोर्चा

बुधवार रोजी सकाळी भारतीय जनता पार्टी कलिना विधानसभेच्या वतीने प्रभाग क्र. 164.165.166.167.168 या प्रभागातील सततची पाणीटंचाई व दूषित पाण्याच्या समस्येबाबत डॉ. नितेश राजहंस सिंह (सरचिटणीस-भाजपा उत्तर मध्य जिल्हा) आणि माननीय पूर्व नगरसेवक हरीश भांदिर्गे (मुख्य निवडणूक अधिकारी-भाजपा चांदिवली विधानसभा) यांच्या नेतृत्वाखाली महापालिका ‘एल’ विभाग कार्यालयावर पीडित महिला व नागरिकांचा महामोर्चा करण्यात आले.ज्यामध्ये नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धडक मोर्चात भाजपचे पदाधिकारी रवींद्र आपटे, नरपत राजपुरोहित, संदीप गुप्ता, रवी यादव, प्रणव सावंत, राजू गुप्ता, प्रभाग अध्यक्ष दीपू सिंग 166. राधेशाम यादव 164, भाग्येश चौधरी 167, भाजप महिला पदाधिकारी प्रतिभा पिंपळकर, हरिताना मोरे, प्रभात शेळके, प्रभात शेंडे आदी उपस्थित होते. गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धडक मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिका विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्थानिक भागातील पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवू, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button