महाराष्ट्रमुंबई

Mumbai: विनोदबाबू माहेश्वरी यांच्या निधनाने माध्यम क्षेत्राची मोठी हानी : मंत्री सुधीर मुनगंटीवार

मध्य भारतातील प्रतिष्ठित माध्यम समूह असलेल्या नवभारत, नवराष्ट्रने जनतेचा आवाज नेहमी बुलंद केला. मुख्य संपादक म्हणून विनोदबाबू माहेश्वरी यांनी हिंदी आणि मराठी पत्रकारितेला नवा आयाम दिला.

विदर्भातील पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात अमूल्य योगदान प्रदान करणारे नवभारत, नवराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक विनोदबाबू माहेश्वरी यांच्या निधनाने माध्यम क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मध्य भारतातील प्रतिष्ठित माध्यम समूह असलेल्या नवभारत, नवराष्ट्रने जनतेचा आवाज नेहमी बुलंद केला. मुख्य संपादक म्हणून विनोदबाबू माहेश्वरी यांनी हिंदी आणि मराठी पत्रकारितेला नवा आयाम दिला. विदर्भासह मध्य भारतातील अनेक पत्रकारांना विनोदबाबू माहेश्वरी यांनी नवभारत, नवराष्ट्रच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. समाजातील गरीब, दीन, पीडित वर्गाचा आवाज विनोदबाबू माहेश्वरी यांनी नेहमीच बुलंद केला.

अल्पशा आजाराने विनोदबाबूंचे निधन झाले. त्यांचे अचानक निरोप घेणे अतीव दुःख देणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वराने प्रदान करावे, या शब्दांत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button