महाराष्ट्रमुंबई

जेंटलमैन गेम होणे महत्त्वाचे !- आमदार अँड आशिष शेलार

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि क्रिकेटसाठी झटणाऱ्या ध्येय वेड्यांंचे एक परिवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासाठी हार

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि क्रिकेटसाठी झटणाऱ्या ध्येय वेड्यांंचे एक परिवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासाठी हार -जीत महत्त्वाची नाही. हा जेंटलमैन गेम आहे, तो त्याच पध्दतीने होणे महत्त्वाचा आहे. ही खिलाडूवृत्तीने लढलेली मैत्रीपूर्ण लढत होती, ज्यामध्ये अध्यक्ष पदी अजिंक्य नाईक यांचा विजय झाला. त्यांचे अभिनंदन.
आता यापुढे आम्ही सगळे मिळून असोसिएशनसाठी काम करु, मी त्यांच्या पाठीशी पुर्णपणे उभा आहे. अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ यशस्वी होईलच. आम्ही
नवनवीन उत्तम खेळाडू तयार व्हावे, त्यांंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकत्रीत कमा करु. आमचे उमेदवार संजय नाईक यांनी सुध्दा खिलाडूपणा दाखवून लढत दिली. आता त्यांना ही मी आवाहन करेन की, आपले हे क्रिकेट परिवार आहे यापुढे सगळ्यांंनी एकत्र काम करु या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button