भारतमहाराष्ट्रमुंबई

भुशी धरण धबधबा दुर्घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी

न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई: लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहाने एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या घटनेत मार्गदर्शक तत्वानुसार कर्तव्य न बजावणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या हडपसर येथील अन्सारी कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्देवी आपत्तीची दखल डॉ.गोऱ्हे यांनी घेतली असून आपद्ग्रस्त कुटुंबास मदत पुरविण्यात यावी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button