मोदी सरकार विरुद्ध नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रदर्शन
मुंबई
प्रतिनिधी :-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरात न्यायालयात दाखल केलेले अपील रद्द केल्याच्या विरोधात आज विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात जोरदार प्रदर्शन करण्यात आले व रास्ता रोको आंदोलन करीत भाजपा सरकारचा निषेध केला.
प्रदर्शना दरम्यान पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, राहुल गांधी मोदी सरकार व अडाणीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध देशांमध्ये अनेक वर्षापासून लढा लढत आहे, म्हणून त्यांच्यावर खोटे प्रकरण दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली तसेच त्यांचे राहते घर सुद्धा खाली करून घेतले, तसेच त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहेत. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी व देशात वाढत असलेला भ्रष्टाचार व महागाईच्या विरोधात राहुल गांधी व काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत आहे. आज संपूर्ण राज्यात प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात मोदी सरकार विरुद्ध प्रदर्शन होत असून मुंबई विभागीय कॉँग्रेस अध्यक्षा श्रीमती. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतही ठिकठिकाणी प्रदर्शने होत आहेत.
नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आजच्या प्रदर्शनात उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश आमिन, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा अनिषा बागुल, महिला जिल्हाध्यक्षा प्रियतमा सावंत, मुंबई काँग्रेस महासचिव विष्णू सरोदे, नगरसेविका विनी डिसोजा, अरविंद त्रिपाठी, विनोद गुप्ता प्रदेश प्रतिनिधि माया खोत, वनिता मुळीक, अभिमन्यू बेहरा, युवक तालुका अध्यक्ष अरुण कुमार यांच्यासह काँग्रेसचे हजारो लोक सामील होते.