क्राईममुंबई

कांदिवली पोलिसांची कारवाई | पाच चोरांची टोळी कारागृहात पोहोचली | चोरीचे ७४ मोबाईल जप्त

कांदिवली पोलिसांची कारवाई | पाच चोरांची टोळी कारागृहात पोहोचली | चोरीचे ७४ मोबाईल जप्त

श्रीश उपाध्याय/मुंबई

बेस्ट बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना कांदिवली पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे ७४ मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांदिवली, बोरिवली, मालाड, मालवणी परिसरात बेस्ट बसमधील प्रवाशांचे मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी साध्या वेशात या भागात धावणाऱ्या बेस्ट बसेसची तपासणी केली. सीसी टीव्हीच्या मदतीने काही संशयितांची ओळख पटली. पोलिसांनी सलीम रईस शेख, अल्ताफ रुपानी, शाहब खान, रमजान लांजेकर और हमीद खान यापांच आरोपींना अथर्व कॉलेजच्या बसस्थानकावरून अटक केली. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे ७४ मोबाईल जप्त करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल, कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वास राव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत गीते, पोलिस निरीक्षक आनंद कांबळे व पथकाने वरील कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button